इंजिनिअरची रताळ्याची शेती यशस्वी, कमाई झाली 6.5 लाख रुपये
Farmer story आजकाल तरुण पिढी शेतीकडे वळताना दिसत नाही. शेती करायची त्यांच्यामध्ये रस नाही. कुठेतरी शहरामध्ये जाऊन छानशी नोकरी करण्यामध्ये आजकालची तरुण पिढी धन्यता मानत आहे. परंतु इंजिनिअर तरुणांना रताळ्याची शेती यशस्वी करून तरुणांकडे एक आदर्श निर्माण केला आहे.
स्वतः इंजिनियर असताना त्याने आपल्या शेतीमध्ये रताळे पिकाची लागवड करून यशस्वीरित्या साडेसहा लाख रुपयांचे उत्पादन काढून परिसरामध्ये कौतुकाचा विषय झाले आहे. त्याने हे उत्पन्न अव्यय 60 गुंठ्यामध्ये मिळवले हे विशेष आहे. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणे ही त्यांची आवड असून त्यांनी रताळ्या लागवडीचा प्रयोग केला असता त्यांना त्यामधून यशस्वी उत्पन्न मिळाले आहे.
शेतीमध्ये मातीचे आरोग्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही वारे माप रासायनिक खते टाकून शेतीचा पोत बिघडत चालला आहे. सांगलीचे असणारे इंजिनियर रामराव पाटील या तरुणांना शेतीमध्ये पिकांची फेरपालट करत सतत बदल केले. कधी भुईमूग मटकी अशी विविध पिके देखील त्यांनी घेतली त्यानंतर त्यांनी रताळ्या लागवड करायची हा निर्णय घेतला. आणि या सात गुंठे लागवड घेऊन त्यांना नऊ टन उत्पादन हाती आले.
रताळ्या त्यांनी ऑगस्ट महिन्यात काढला असून त्यांना नऊ टन उत्पादन हाती आले. बाजारभावापमाणे त्यांना खर्च वज होता साडेसहा लाख रुपये उत्पन्न मिळाले त्यांनी सांगितले. रताळे त्यांनी मुंबईच्या मार्केटमध्ये विकली असून त्यांना टनाला 70 हजार रुपयांचा भाव लागलेला आहे. आवक कमी असल्याने त्यांना चांगली कमाई झाली.
रताळे पिके कांद्यासारखंच तीन ते साडेतीन महिन्यात येणारे पीक असून त्यासाठी त्यांनी विविध औषधे खते यांचे डोसेस तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दिले आणि रताळ्या पीक यशस्वी केले.
महत्वाच्या बातम्या
रिटायरमेंट नियोजन करताना या पाच चुका कधी करू नका, नाहीतर अडचण होणार
या लोकांना सत्तेचा उन्माद चढला आहे, यांना खड्यासारखे बाहेर काढा- शरद पवार
एसटी महामंडळाचा ऐतिहासिक निर्णय, तक्रार असल्यास थेट अगर प्रमुखांना करा फोन.