नाशिक मधील द्राक्ष उत्पादकांना व्यापाऱ्यांनी लावला कोट्यावधींचा चुना शेतकऱ्यांची अजितदादांकडे कैफियत

नाशिक मधील द्राक्ष उत्पादकांना व्यापाऱ्यांनी लावला कोट्यावधींचा चुना शेतकऱ्यांची अजितदादांकडे कैफियत

महाराष्ट्र मध्ये नाशिक सोलापूर सांगली सातारा ही प्रमुख द्राक्ष उत्पादक जिल्हे असून या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षांची निर्यात व्यापाऱ्यांच्या मार्फत होत असते परंतु आता एक नवीन बातमी समोर येत आहे नाशिक मधील शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी गंडा घातल्याचे समजले आहे. अशा बातम्या दरवर्षी येत असून याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

राज्यातील शेतकऱ्यांनी या प्रकरणासाठी द्राक्ष उत्पादक संघाकडे तक्रार देखील केली असून यावर त्वरित पावले उचलावी असे शेतकऱ्यांची मागणी होत आहे. तसेच पोलीस स्टेशनला देखील तक्रारी दिल्या असल्याचे समजत आहे. एकट्या नाशिक जिल्ह्याचा विचार करायचा झाल्या तर एकट्यां नाशिक जिल्ह्यातून फसवणुकीच्या सातशे तक्रारी समोर आल्या आहेत. यावरून राज्याचा विचार करायचा झाल्या तर त्या तक्रारी हजारोंच्या घरात जातील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिक जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक मोठ्या प्रमाणात असून दरवर्षी अशा फसवणुकीच्या तक्रारी येत असतात. शेतकरी आपल्या तक्रारी  द्राक्ष उत्पादक संघ कडे देत आहेत. नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यातील फसवणूक झालेले शेतकऱ्यांची जास्त असून व्यापारी गंडा घालून पळून गेले आहेत असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दोन दोन वर्षे झाली तरी त्यांना आपल्या विकलेल्या द्राक्षाचे पैसे मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी आपले गाराने मांडले आहे.

आशा फसवणुकीपासून शेतकऱ्यांना वाचवावे असे सर्व स्तरातून अपेक्षा होत आहे. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे अशी ही मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. परंतु प्रशासनाकडून कोणतीही पावले उचलली जात नाहीत यामुळे शेतकऱ्यांनी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे ही तक्रार नोंदवली आहे. यापुढे द्राक्ष उत्पादकांची फसवणूक होणार नाही यासाठी कायदा ही करण्यात यावा अशी ही मागणी मांडण्यात आली आहे.

महाराष्ट्र मध्ये नाशिक जिल्हा हा द्राक्ष उत्पादनामध्ये अग्रेसर जिल्हा असून या जिल्ह्यामधूनच तक्रारींच्या बातम्या समोर येत आहेत. या नाशिक जिल्ह्यातूनच 700 शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून या 700 शेतकऱ्यांचे जवळपास 50 ते 70 कोटी बुडवून व्यापारी पळून गेले असल्याची माहिती मिळत आहे. शेतकऱ्यांकडे यासाठी कोणतेही पुरावे नसल्यामुळे त्यांची मागणी पोलीस प्रशासन ऐकून घेत नाही असे देखील शेतकऱ्याकडून सांगण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्याआता शेतकरीही वीज विकणार आणि पैसे कमवणार -देवेंद्र फडणवीस

बळीराजासाठी आनंदाची बातमी- कांद्यामधील निर्यात शुल्क पूर्ण हटवले. 

मोठी घोषणा , अंदमान निकोबार च्या राजधानीचे नाव बदललं हे असं नवीन नाव..

 

Leave a Comment