महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मोदी सरकार कोसळणार ‘या’नेत्याचा दावा
महाराष्ट्र विधानसभा कार्यकाल संपुष्टात येत आहे. पुढच्या महिन्यामध्ये निवडणुका होणार असल्याचे अटळ असून या निवडणुका झाल्यानंतर केंद्रातील मोदी सरकार कोसळणार आहे असा अंदाज काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाणांनी वर्तवला आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा सत्ता बदल होऊन महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत. महाराष्ट्रातील निवडणुका नंतर चंद्रबाबू नायडू आणि नितिश कुमार हे आपला पाठिंबा काढून घेतील असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
सध्याचे मोदी सरकार हे नितिश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या पाठिंबा वरती असून ते महाराष्ट्र विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पाठिंबा काढून घेतील आणि त्यामुळे सरकार कोसळेल असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार देखील 13 महिन्यानंतर कोसळले होते असे उदाहरण देखील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहे.
महाराष्ट्रातील जनतेने जर मनात आणले तर हे महायुती सरकार सुद्धा पाय उतार होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल लक्षात घेऊन चंद्रबाबू नायडू आणि नितिश कुमार हे सरकारमधून बाहेर पडतील. असा पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा आहे.
महायुतीच्या सरकारमध्ये राज्यातील स्थिती अत्यंत दयनीय झाले असून बदलापूर मधील घटना तसेच मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त होणे असे अनेक प्रश्न सरकारविषयी जनतेच्या मनात तयार झाले आहेत. याचा फायदा विधानसभा निवडणुकी ला होणार आहे. याची चीड जनता विधानसभा निवडणुकीतून दाखवून देईल असा दावाही देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
अशा वातावरणामध्ये भाजपकडून राष्ट्रपती राजवट देखील लावणी जाण्याची शक्यता पृथ्वीराज चव्हाण आणि वर्तवली असून सरकार यावर काय उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात झालेल्या विविध घटनांच माहिती सरकार पायउतार होण्याला कारणीभूत ठरतील आणि हे सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
राहुल गांधी जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार-भाजप
नाशिक मधील द्राक्ष उत्पादकांना व्यापाऱ्यांनी लावला कोट्यावधींचा चुना शेतकऱ्यांची अजितदादांकडे कैफियत
आता शेतकरीही वीज विकणार आणि पैसे कमवणार -देवेंद्र फडणवीस