मोदी सरकारने केली नवीन पेन्शन योजनेची घोषणा मिळणार हे फायदे
भारत सरकारच्या मंत्रिमंडळाची शनिवारी एक महत्त्वाची बैठक झाली त्यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. जुनी पेन्शन योजना नवीन नवीन पेन्शन योजना यांचा समन्वय साधून एकीकृत पेन्शन योजनेची घोषणा केली आहे. या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये इतरही महत्त्वाचे निर्णय लोकहिताचे निर्णय घेण्यात आले आहेत.
गेले काही दिवसापासून जुन्या पेन्शन योजना विरोधात केंद्रीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याच्यावर उपाय म्हणून सरकारने युनिफाईड पेन्शन स्कीम ही नवीन पेन्शन स्कीम आणली आहे. कर्मचारी रिटायर झाल्यानंतर या पेन्शनचा अनेक प्रकारचा लाभ त्यांना मिळू शकेल म्हणून ही पेन्शन योजना आणण्यात आली आहे.
युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे. या पेन्शन बरोबरच कर्मचाऱ्यांना विविध प्रकारचे लाभ देखील या द्वारे मिळणार आहेत चला तर जाणून घेऊया स्कीम विषयी.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अश्विनी वैष्णव या मंत्र्यांनी पेन्शन स्कीम विषयी माहिती दिली आहे. योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि सामान्य माणसासाठी गठीत करण्यात आले आहे. देशात जेवढे पोलीस ,आरोग्य, रेल्वे, डाक विभागामध्ये कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे. ते कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्यांना एक सामाजिक किंवा आर्थिक सुरक्षा म्हणून ही पेन्शन योजना महत्त्वाची ठरत आहे. निवृत्तीनंतर त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास आर्थिक बाबतीचा कोणताही त्रास होणार नाही याची काळजी पेन्शन द्वारे मिटणार आहे. एक एप्रिल 2025 पासून या पेन्शन योजना ची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
निवृत्तीच्या आधी बारा महिने जेवढा पगार असेल त्याच्या 50% ही पेन्शन दिली जाणार आहे. पेन्शनच्या रूपाने ही रक्कम दरवर्षी त्यांच्या खात्यामध्ये देण्यात येईल. या पेन्शनच लाभ तेव्हा देण्यात येईल तुम्ही पंचवीस वर्ष सेवा केलेली असेल.
जर कर्मचाऱ्यांचे निधन झाले तर त्यांच्या कुटुंबाला 60 टक्के रक्कम पेन्शन स्वरूपात बहाल केली जाईल.
कर्मचाऱ्यांची जर दहा वर्षे सेवा झाली असेल तर त्यांना मासिक दहा हजारापर्यंत पेन्शन मिळेल आणि मग महागाई भत्ता हा सर्व मिळून त्यांची पेन्शन ही 15000 पर्यंत जाईल.
कोणताही कर्मचारी निवृत्त झाला तर त्याला ग्रॅज्युटी बरोबर एक रकमी देण्यात येईल.
या केंद्र सरकारच्या योजनेचा 23 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. कोणालाही युनि फाईड पेन्शन स्कीम चा पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य असेल. किंवा त्याला नवीन पेन्शन अंतर्गत सुद्धा रक्कम देण्यात येईल. जर विविध राज्यातील कर्मचारी जर या योजनेअंतर्गत सामील होतील तर ही संख्या एक कोटीच्या वर जाईल.
भारत सरकारच्या आर्थिक सचिव सोमनाथ यांनी सांगितले की सन 2004 नंतरचे कर्मचारी निवृत्त झाले आहेत ते सुद्धा या युनिफाईड पेन्शन स्कीम च लाभ घेऊ शकतात. वीस वर्षाचे सर्व रेकॉर्ड सरकार जवळ असल्याने या पेन्शनचा ते लाभ घेऊ शकतात. जो कोणी कर्मचारी पेन्शन स्कीमचा पर्याय सिलेक्ट करेल त्यानंतर पूर्ण लेखाजो केल्यानंतर त्याची पूर्ण रक्कम त्यांच्या खात्यात टाकली जाईल. भारत सरकार ती पूर्ण रक्कम त्याच्या खात्यामध्ये वर्ग करेल