Rajendra Rauat aandolan आमदार राजेंद्र राऊत यांचे बार्शी मध्ये ठिय्या आंदोलन
गेल्या काही दिवसापासून मराठा आंदोलन करते मनोज जरंगे पाटील यांच्यावर केलेले टीकेमुळे बार्शी जामदार राजेंद्र राऊत हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाले आहेत. मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवून त्यामध्ये निर्णय जाहीर करून टाकावा यासाठी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी आंदोलनास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे हे अपक्ष निवडून आलेले आमदार यांनी भाजपला पाठिंबा दिला होता.
जास्तीत जास्त आमदारांनी विशेष अधिवेशनाला पाठिंबा दिला तर अध्यक्षांना ते अधिवेशन घ्यावेच लागेल यासाठी सर्व मतदारांनी येथे विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन देखील राजेंद्र राऊत यांनी केले आहे. जर त्याने विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी धुळकावली तर पाच कोटी मराठ्यांनी पूर्ण विधानसभा निवडणुकीवरच बहिष्कार घालावा असे देखील आवाहन राजेंद्र राऊत यांनी केले आहे.
राजकारणासाठी मराठ्यांचा वापर करू नये.कोणीही मराठ्यांना झुलवत ठेवू नये असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.ते पुढे.असेही म्हणाले की मी मा.देवेंद्र फडणवीस, मा.अजित पवार, मा.एकनाथ शिंदे मा. शरदचंद्र पवार यांना देखील पत्र लिहून विशेष अधिवेशनाची मागणी केलेली आहे. तसेच सर्व आमदारांना देखील पत्र दिली असल्याची त्यांनी म्हटले आहे.
एक ते पाच ऑक्टोबरच्या दरम्यान आचारसंहिता लागल्याचे संकेत मिळत असताना फक्त आपल्याकडे थोडे दिले दिवस शिल्लक राहिल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरकारने जर यावर विचार नाही केला तर पूर्ण निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहनही त्यांनी मराठा समाजाला केले आहे.
मी वयाच्या सोळाव्या वर्षापासून मराठा आंदोलनामध्ये सहभागी असून मी सध्या अपक्ष आमदार असलो तरी मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलावणे यासाठी मी सर्वांना पत्रे दिली असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाचा वापर राजकारणासाठी कोणीही करू नका असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्र मराठा आरक्षणाचा वापर करू नका असा टोलाह त्यांनी विरोधकांना दिला आहे