Warning: सावधान! प्लास्टिक फुले वापरली तर भरावा लागेल एवढा मोठा आर्थिक दंड
महाराष्ट्र मध्ये गोकुळाष्टमी पासून खूप मोठ्या सणांची सुरुवात होणार आहे गोकुळाष्टमी गणेशोत्सव महालक्ष्मी तसेच दिवाळी अशी सणांची रेलचेल असणार आहे. हे सन प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये खूप धुमधडाक्यामध्ये साजरे केले जातात या सणांमध्ये सजावटीसाठी खूप मोठे प्लास्टिकचे सामान वापरामध्ये येत असतील. यामध्ये थर्मकोल प्लास्टिकची फुले अशा सजावटीसाठी वस्तू वापरल्या जातात. प्लास्टिकची फुले ही सस्त आणि परवडत असल्याने याचा वापर प्रामुख्याने होत असतो.
परंतु याच्या वापराने पर्यावरणाचे खूप मोठे नुकसान होत असते यामुळे महाराष्ट्र शासनाने याच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याच्या वापरावर आता महाराष्ट्रामध्ये पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोर्टामध्ये एक याचिका दाखल करून आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे.
या बंदीची सर्व जबाबदारी ही स्थानिक स्वराज्य संस्था महसूल विभाग यांच्यावरती सोपवलेली आहे. सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की जास्तीत जास्त बंदी घालण्यासाठी कोणताही अडथळा दिसत नाही. सरकारला आपल्या पूर्ण आता ताकदीचा उपयोग करायला हवा कारण, अशी प्लास्टिकचे फुले पर्यावरणासाठी अत्यंत घातक मानली गेली आहेत.
महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळाच्या याचिका नुसार 100 मायक्रोन पेक्षा कमी जाळीच्या प्लास्टिकच्या फुलावर बंदी घालण्यात आली आहे. बाजारामध्ये सहसा तीस मायक्रोन च्या जाडीची फुले विक्री होत आहेत अशी फुले पर्यावरणासाठी अत्यंत घातक मानली गेली आहेत. अशा फुलांचा पुनर्वापर होऊ शकत नाही या फुलामुळे जमिनीचे खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते अशी फुले जैवविविधतेसाठी अत्यंत धोकादायक आहेत.
दाखल केलेले याचिकेनुसार प्लास्टिकच्या फुलांची विक्री वर अंकुश ठेवण्यासाठी प्रदूषण महामंडळाने राज्य आणि जिल्हा टास्क फोर्स निर्माण केला गेला आहे. हे टास्क फोर्स असे सिंगल युज प्लास्टिकची विक्री रोखण्यासाठी महत्त्वाचे कार्य करत आहेत. ही प्लास्टिकची फुले प्रतिबंधित वस्तू अशा श्रेणीमध्ये टाकण्यात आले आहेत. केंद्रीय प्रदूषण महामंडळाला याविषयी महत्त्वाची पावले उचलण्याविषयी सांगितले गेले आहे. हे मंडळ हा विषय संबंधित विभागाकडे मांडून प्लास्टिकच्या फुलांची प्रतिबंधित वस्तूंमध्ये समावेश कसा होईल यासाठी पावले उचलत आहे.
अशा फुलांना रंग देण्यासाठी एकदम धोकादायक केमिकलचा वापर केला जातो. असे रंग जर पर्यावरणामध्ये मिसळले तर पर्यावरणासाठी खूपच मोठी धोक्याची घंटा ठरू शकते. यामुळे पर्यावरणाचे खूप मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षी या प्रतिबंधित उत्पादनापासून दंड ठरवण्यात आला होता
चीन, यु एस ए, तैवान ,श्रीलंका ,इटली, दुबई ,हॉंगकॉंग अशा देशांमधून अशी प्लास्टिक फुले खूप मोठ्या प्रमाणावर आयात केली जातात. ही प्लास्टिकची फुले आपल्या भारतामध्ये बाजारात येण्यापासून या देशांमधून आयात रोखावे लागेल. हाच एकमेव उपाय भारतभूमीला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी योग्य ठरू शकतो.